हरबरा लागवड अशी कराल

हरबरा लागवड अशी कराल♥प्रगतशील शेतकरी♥

♥साधारणपणे जगातील एकून हरबऱ्याच्या पिकापैकी ७८% पीक भारत व ९% पीक पाकिस्तानात पेरले जाते, उरलेले १३ % पीक जगातील इतर भागांत पेरले जाते. भारतामध्ये हे पीक पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल व कर्नाटक या राज्यांत मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार)

♥महत्त्व : हरबऱ्याचे कोवळे शेंडे भाजी म्हणून वापरतात. दाणे पक्व होण्यापूर्वी कच्च्या स्वरूपात खाल्ले जातात. हरबऱ्यांच्या मुळावरील गाठींमुळे नत्राचे जमिनीतील प्रमाण वाढते. हरबऱ्यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे घोडे व इतर जनावरांना खुराक म्हणून हरबरा दिला जातो. मिठाई करण्यासाठी चण्याच्या पिठाचा उपयोग करतात. टरफलासह दाण्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण १६ ते १९ % असते. नुसत्या डाळीत २२ ते २५ % असते. हरबऱ्याच्या कोवळ्या पानात मॅलिक व ऑक्झॉंलिक आम्ल असते.
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार)

♥जमीन व हवामान : मध्यम किंवा मध्यम भारी रानात हरबऱ्याचे पीक घेतात. कमी ते मध्यम पावसाच्या प्रदेशात (६५० ते १००० मिमी) हे पीक उत्तम प्रकारे घेता येते. कडाक्याची थंडी मात्र या पिकास सहन होत नाही. ५ डी. सेल्सिअसच्या वर तापमान असणाऱ्या भागात हरबऱ्याची वाढ चांगली होते.
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार)

♥पूर्व मशागत : खरीपाचे पीक काढल्यानंतर १ नांगरट व कुळवाच्या २ पाळ्या देतात. मशागतीच्या वेळीच पूर्ण कुजलेले शेणखत आणि सेंद्रिय खत १०० ते १५० किलो एकरी द्यावे.
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार)

♥बी - बियाणे आणि पेरणीचा कालावधी :

जातीपरत्वे हरबऱ्याचे एकरी बियाणे २५ ते ४० किलो लागते. हरभऱ्याची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या १५ तारखेनंतर ३ - ४ आठवड्यांपर्यंत करतात.
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार)

♥बीजप्रक्रिया : मर या रोगापासून वाचविण्यासाठी आणि उगवण चांगली होण्यासाठी बीज प्रक्रिया करावी. म्हणजे उगवण चांगली होते, तसेच हवेलीत नत्र खेचून हरबऱ्याच्या मुळावर नत्राच्या गाठी वाढतात. त्यामुळे रासायनिक खतात बचत होते. जमीन खराब न होता जमिनीची जैविक सुपिकता वाढते. त्यामुळे उत्पादन व दर्जा दोन्हीत वाढ होतो.
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार)

♥सुधारित वाण : हरबऱ्याचे विविध सुधारित वाण पुढील तक्त्यात दिले आहेत.
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार)

अ. क्र.  वाण  पिकाचा कालावधी (दिवस)  उत्पन्न (क्विं./ एकरी)  प्रमुख वैशिषट्ये 
१)  विकास  १०५ -११०  जिरायत ४.५ ते ५ बागायत ९ ते १०  जिरायत क्षेत्रासाठी योग्य वाण 
२)  विश्वास  ११५ - १२०  जिरायत ४ ते ४.५ बागायत ११ ते १२  टपोरे गोल दाणे, पाणी व खतास प्रतिसाद देणारा वाण, राष्ट्रीय वाण म्हणून प्रसारित 
३)  फुले जी - १२  १०५ -११०  जिरायत ५ ते ५.५ बागायत ११ ते १२  जिरायत तसेच बागायतीसाठी योग्य वाण 
४)  विजय  ८५ - ९०  जिरायत ६ ते ६.५  मर रोगास प्रतिकारक्षम तसेच अवर्षण प्रतिकारक्षम जिरायत बागायत तसेच उशीर पेरणीसाठी योग्य वाण. आकर्षक पिवळे टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक्षम, अधिक उत्पादन क्षमता. 
५)  विशाल  ११० -११५  जिरायत ५.५ ते ६ बागायत १२ ते १४ 
६)  श्वेता  १०० -१०५  जिरायत ३.५ ते ४ बागायत ७.५ ते ८  काबुलीवाण, मर रोगास प्रतिकारक्षम, टपोरे दाणे, हळवा वाण. 
७ )  भारती  ११०-११५  जिरायत ५.५ ते ६ बागायत १२ ते १३  मर रोग प्रतिकारक्षम, जिरायत तसेच बागायतीसाठी योग्य 
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार)

♥पेरणीच्या वेळी तापमानाचा अंदाज घेऊन योग्य वेळी पेरणी करावी. पेरणी जर तिफणीने केली तर दोन ओळींत ३० ते ४५ सेंमी अंतर ठेवतात. पेरणी जमिनीखाली ७ ते १० सेंमी खोल करावी.
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार)

♥आंतरमशागत व तणनियंत्रण : पेरणीनंतरसुरूवातीचे ४ ते ६ आठवडे जमीन तणविरहित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी १ खुरपणी व १ कोळपणी आवश्यक आहे. पेरणीनंतर कोळपे फिरवल्यास हवा खेळती राहून पीक चांगले वाढते.
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार)

♥खत व्यवस्थापन : उपलब्धतेनुसार पुर्ण कुजलेले शेणखत आणि  सेंद्रिय खत कोरडवाहू पिकास ५० ते ७५ किलो तर बागायत पिकास १०० ते १५० किलो एकरी द्यावे.
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार)

♥हरभरा पाणी व्यवस्थापन♥ प्रगतशील शेतकरी ग्रुप♥

♥हरभरा पेरणीनंतर ८ - १० दिवसांनी एक

घाटे भरून काढण्याच्या वेळी एक
अशा किमान २ - ३ वेळा पाणी दिल्यास पीक उत्तम येते.

♥तथापि हवामानात उष्णतेचे प्रमाण वाढत गेल्यास पाण्याची जादा पाळी देणे गरजेचे आहे.

♥गरजेपेक्षा जादा पाणी देण्याचे मात्र कटाक्षाने टाळावे.
कारण
जादा पाण्यामुळे वाढ जादा होऊन घाटे येण्याचे प्रमाण मात्र कमी होते
व पर्यायाने उत्पन्न कमी होते.

संकलित!

हरभरा फवारणी नियोजन असे कराल♥प्रगतशील शेतकरी ग्रुप ♥

♥ हरभरा फवारणीसाठी लागणारी सामग्री
1.हेलिओकील
किंवा
क्विनॉलफॉस
2. तुषार सिंचनाने (स्प्रिंक्लर)
किंवा
फवारणी पंप
3.पाणी
4. रॅनॅक्‍झीपार

♥सध्याच्या काळात घाटे अळी (हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा) प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यास किंवा अळी लहान अवस्थेत असेल,
तर नियंत्रणासाठी हेलिओकील 500 मि.लि. 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्‍टरी फवारावे
किंवा
क्विनॉलफॉस दोन मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

♥अळी मोठ्या अवस्थेत असेल, तर रॅनॅक्‍झीपार दोन मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

♥दाट धुक्‍यामुळे हरभरा फूलगळ होऊ शकते.

या काळात तुषार सिंचनाने पाणी द्यावे

किंवा

फवारणी पंपाने पिकावर पाणी फवारावे. त्यामुळे पानावरील धुके निघून जाईल.

संकलित!

(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार)

♥पीक संरक्षण : हरबऱ्यावर मुख्यत्वे मुळकुजव्या मर, भुरी आणि गेरवा हे रोग पडतात.
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार)

पेरणीनंतर लगेचे हवेतील तापमानात वाढ झाल्यास मुळकुजव्या रोगाचा उपद्रव होतो. लहान - लहान रोपे वाळू लागतात व मरतात, यासाठी तापमान योग्य व थंड असतानाच पेरणी करावी आणि बीजप्रक्रिये आवश्य वापरावे. मर हा रोग जिवाणूंमुळे होतो. चांगले वाढलेले झाड एकाएकी वरपासून वाळू लागते. यासाठी एन -३१ व एन -५९ या जाती रोगप्रतिबंधक जातींची शिफारस केलेली आहे.

♥हरबऱ्यातील कीड :
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार)

घाटेअळी : हरभऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करणाऱ्या किडीत घाटेअळी प्रमुख आहे. घाट्यात अळी शिरते व आतील सर्व दाणे फस्त करते. या अळीचा बंधोबास्त करण्यासाठी किटकनाशकाचा  पुढीलप्रमाणे दर पंधरा दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा फुले येण्याच्या सुरूवातीपासूनच केल्यास पिकाचे संरक्षण होते. मात्र अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे जाणवताच रासायनिक किटकनाशकाची फवारणी घ्यावी.

♥हरबऱ्याची वाढ समाधानकारक होऊन अधिक फुल - फलधारणा होऊन घाट्यामध्ये ठसठशीत दाणे भरण्यासाठी अर्थातच दर्जा व उत्पदान वाढीते.
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार)

♥पीकपक्वता / काढणी : शेताच्या सर्व भागांतील पीक वाळल्यावर पाने झडतात. त्यानंतर पिकाची कापणी जमिनीलगत कापून केल्यास नत्राच्या गाठी असलेल्या मुळ्या जमिनीत राहून त्यातील नत्राचा पुढील पिकास उपयोग होतो. साधारणत: कोरडवाहू क्षेत्रामध्ये एकरी २०० ते ३०० किलो तर बागायती क्षेत्रामध्ये ६०० ते ९०० किलो इतके उत्पादन येउ शकते.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!