सोयाबीन लागवडीचे नियोजन असे कराल

सोयाबीन लागवडीचे नियोजन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥

♥सोयाबीन पिकाकरीता लागणारी जमिन

१) मध्यम स्वरुपाची
२) भुसभुशीत व पाण्याच्या निचरा होणारी
३) उत्तम सेंद्रीय पदार्थ असलेली
४) चोपण व क्षारपड जमिन वापरू नये
५) पुर्वी सुर्यफुल घेतलेले शेत वापरू नये
६) जमिन मे महिन्यात नांगरट केलेली उन्हाळ्यात तापू दिलेली स्वच्छ असावी.
७) जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ पर्यत असलेली निवडावी.
८) एकदम हलक्या मुरमाड जमिनी या पिकास योग्य नसतात.

♥ सोयाबिन लागवड माहिती

१)सोयाबीनची पेरणी १ जुन ते १५ जुन दरम्यान करावी

२)सरी वरंबा पध्दतीने लागवड केल्यास उत्पन्न चांगले मिळते. याकरीता ३ फुट अंतरावर सरी पाडून सरीच्या दोन्ही बगलेत १०-१५ सेमि अंतरावर सोयाबीन टोपावे.

३)लागवड अंतर ४५ X १०-१५ सेमि

४)एकरी ३० कीलो बियाणे वापरावे टोपण पध्दतीने २० कीलो बियाणे

५)पेरणीपुर्वी एकरी ७ टन शेणखत द्यावे आणि २५ किलो युरीया + १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट + २५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश + १० किलो फेरस सल्फेट + ५ किलो झिंक सल्फेट + २ किलो बोरॅक्स सरीमध्ये चर घेऊन ५ से.मी. खोल व ५ सेंमी. बियापासून दुर द्यावे.

६)पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम, पीएसबी व ट्रायकोडर्माची प्रक्रीया करावी.

७)सोयाबीन + उस आंतरपिक फायदेशिर आहे.

८)सोयाबिन + चवळी + मका + मोहरी आंतरपिक घ्यावे. ज्यामुळे एकात्मीक किड नियंत्रण होते.

सोयाबिनची झाडे पिवळी पडत आहेत
तसेच त्याची उंचीही वाढत नाही त्याचे कारण! ♥प्रगतशील शेतकरी♥

♥पिकात पाणी साचल्यास काय कराल

जर सतत पाऊस झाल्यास पाणी जास्त दिवस साचणार नाही, याची काळजी घ्यावी.

शेतातुन अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी योग्य व्यवस्था करावी.
पाणी जास्त दिवस साचल्याने मुळांना ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी पडतो, मुळसड, रोग वाढणे आणि अन्नद्रव्यांचे शोषण बंद झाल्याने पीक पिवळे पडायला लागते, म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता दिसायला लागते.

पावसामुळे साचलेले पाणी त्वरित बाहेर काढावे. पिके पिवळी पडली असल्यास २% युरिया किंवा १९:१९:१९ ची ७५ ग्राम / १० लिटर पाण्यात घेवून फवारणी करावी. गरज भासल्यास सुक्ष्म अन्नद्रव्य फवारावे.

♥पावसाचा खंड पडल्यास संरक्षित ओलित द्यावे.

♥रस शोषणा-या किडींच्या नियंत्रणासाठी  डायमेथोएट (०.०३ टक्के) या किटक नाशकांची फवारणी करावी.

♥मुळाजवळ हवा खेळती राहण्यासाठी नत्र गाठीचे प्रमाण वाढण्यासाठी पिकाला कोळपणी/डवरणी आणि मातीचा भर द्यावा.

♥तण आणि पीक यांची ओलावा, अन्नद्रव्य, सूर्यप्रकाश आणि जागा यासाठी स्पर्धा होणार नाही याची काळजी घ्यावी.
योग्य वेळी डवरणी/कोळपणी आणि निंदण करून पीक 40 दिवसांपर्यंत तणमुक्त ठेवणे गरजेचे आहे.

♥पेरणी नंतर १० ते १५ दिवसाच्या आसपास पहिली फवारणी निंबोळी अर्काचि करावी.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!